Tuesday, June 7, 2016

Full time vacancies for Assistant Professors' posts

Following from Prof. Sunder Rajdeep, HoD, University of Mumbai: 


There are full-time vacancies to be filled for the post of Assistant Professor for BMM on an urgent basis at the following colleges. 

Colleges:
1. Dr. Babasaheb Ambedkar Model college, Ambadave, Taluka: Mandangad, District: Ratnagiri.

2. Smt. V. V. Dalvi Model college, Tarele, Taluka : Kankavli, District: Sindhudurg.

Interested and eligible candidates can email their resumes latest by Thursday i.e. 9th June 2016, 6 pm, on sunderrajdeep@gmail.com.

Eligibility: Master in Media/ PR/Advertising/ Communication/Journalism /film studies/ television studies and NET/SLET.

Monday, May 30, 2016

नर्मदा किनाऱ्यावरची गाणारी शाळा

माझी आणि भारतीची नेमकी ओळख कधी झाली ते आता नक्की आठवत नाही. भारती म्हणजे भारती ठाकूर. नर्मदा परिक्रमेवरचे  नर्मदा परिक्रमा – एक अंतर्यात्रा  ’  हे तिचे पुस्तक आहे. भारती, उषाताई पागे आणि निवेदिता म्हणुन त्यांची एक मैत्रीण – अशा तिघींनीच संपूर्ण नर्मदा परिक्रमा चार-सहा महिने चालुन केली होती. त्यावरचे तिचे हे अत्यंत साधे-सरळ आणि प्रांजळ वर्णन आहे. एवढी परिक्रमा केली म्हणुन कुठलाही दंभ नाही, की अभिनिवेश नाही. भारतीइतकेच नितळ-आरसपानी असे तिचे हे नर्मदेकाठचे प्रवासवर्णन. पण हे पुस्तक वगैरे नंतरचे. माझी तिच्याशी झालेली ओळख ही त्याआधीची. बहुधा माझा कुठलासा लेख लोकसत्तात वाचून तिने मला शोधून काढून फोन केला होता. मी तुमचे लेख आवर्जुन वाचते. छान लिहिता. नेहमीच तुमच्या लेखांची वाट बघत असते. वगैरे. हे देखील तसे नित्याचे. कुणी खूप मनापासून फोन करतात. आवडल्याचे आवर्जुन सांगतात, आपणही ते ऐकतो, क्षणभर सुखावतो, पण दिवसभराच्या धकाधकीत ते मागे पडते. ती ओळख तेवढ्यावरच विरुन देखील जाते. पण अशी क्षणिक ओळख होऊनही काही नाती दृढ होतात, तसे भारतीच्या बाबतीत घडले. 

मागच्या महिन्यात भारतीकडे गेले होते तर माझ्याच लक्षात आले की मध्यप्रदेशात मंडलेश्वरजवळील लेपा गाव माझ्या नेहमीच्या वाटेवर नसूनही मी एव्हाना तब्बल पाच वेळा लेपाला जाऊन आले आहे. मधली सहा वर्ष मी स्वत: मध्यप्रदेशात, भोपाळला रहायला होते. मलाही कामानिमित्त मध्यप्रदेशात खोलवर गावा-गावात जाण्याचा योग आला. त्यातच भारतीशी प्रत्यक्ष भेट झाली. तिचे काम पाहिले. नियमित फोन नसतो, पण आता भारतीशी झालेली ओळख खंबीर पायावर उभी आहे. मध्ये कितीही काळ गेला तरी फोन करताच पुन्हा त्या क्षणापासून मधला काळ सांधला जातो.

भारती ठाकूर कोण आणि तिची ओळख मी का करुन देत आहे असा प्रश्न एव्हाना मनात आलाही असेल. तर भारती मुळची नाशिकची, नर्मदा परिक्रमा करता करता महेश्वरपाशी आली. परिक्रमेदरम्यान नर्मदाप्रकल्पामुळे विस्थापित झालेली गावे तिला दिसत होतीच. अशाच कुठल्याशा  गावात शाळा सुरु करण्याचा ध्यास तिच्या मनाने घेतला. नाशिकमधले सुखवस्तू जीवन सोडून, भरभक्कम पगाराची नोकरी सोडून काट्याकुट्यात, नर्मदेकाठच्या लोकांच्या मुलांना शिकवण्यासाठी ती, नाशिक आणि तिची माणसे सोडून महेश्वरनजिक आली. परक्या गावात, परक्या लोकांत राहिली. त्यांना विश्र्वास दिला, मुलांना शिकवण्याचे व्रत घेतल्यासारखे पायपीट केली. 

आज गावागावातल्या शाळांत मिळुन तिच्यापाशी चौदाशे मुले शिकत आहेत. शिक्षक आहेत. लेपा गावात तिच्या नर्मदालय संस्थेची दुमजली वास्तु आहे, पसारा वाढला आहे. वाढत आहे. तिने गावात शाळा काढावी म्हणुन आग्रहाने गावकरी तिला बोलवत असतात. शाळेपासून दूर पळणारी मुले शाळेकडे धावत येतात. आणि हो, तिच्या शाळांचे वैशिष्ट्य म्हणजे तिच्या शाळांमधली मुले शाळेत यायला निघाली, चौकात एकमेकांना भेटली की गायला लागतात, वाटेवर गातात, त्यांना घेऊन जाणा-या बसची वाट पहाताना गातात, बसमध्ये गातात, शाळेत पोचली की गातात आणि शाळेतून घरी परत जाईपर्यंत गातच रहातात. भारती सांगते की इतर शाळांमधून जेव्हा मुले रडत रडत शाळेत जातात तेंव्हा आमच्या शाळेतली मुले गात गात जातात. पुन्हा सगळेच गात असल्यामुळे नविन येणा-या मुलाला तसा रडायला वाव मिळत नाही. 

भारतीच्या या शाळाही दिवसभरात केवळ काही तासाच्या, त्यानंतर मुले आपापल्या कामाला जाऊ शकतात. मुलं गुरं चरायला गुरांच्या पाठी जातात, घरात आपल्या भावंडांची पाठराखण करतात, शेतात आई-वडिलांसोबत जातात, शाळा नसती तर जे काही त्यांनी दिवसभरात केले असते ते सर्व काही करतात. दिवसभराच्या कामाला मुलेही हातभार लावत असल्यामुळे पालकांचीही तक्रार नाही, मुलेही शाळेत डांबून रहात नाही. गणवेशाची सक्ती नाही. कारण युनिफॉर्म वगैरेचे चोचले कोणालाच परवडण्यासारखे नसतात.

आपल्या काही शहरी कल्पना असतात. एकतर अलिकडे एक आणि दोन मुलांच्या मर्यादित कुटुंबामुळे आपण मुलांचे लहानपण खूपच लांबवले आहे. मुलांच्या शिक्षणासाठी आई-बापांनी वाटेल ते कष्ट करावेत, प्रचंड पैसे उभे करावेत. मुलांना शिकवावे, परदेशी धाडावे, लग्न करुन द्यावे. त्यानंतरही होता होईल तेवढे परदेशी फे-या मारुन त्यांच्या मागे उभे राहावे, थोडक्यात आपल्याला जी ओढाताण करावी लागली ती आपल्या मुलांना करावी लागू नये अशी आताच्या रिटायरमेंटला पोचणा-या पिढीची मानसिकता आहे. ऐंशी-नव्वदच्या दशकात शिक्षण-लग्न ही ज्याची त्याची जबाबदारी होती. ती जबाबदारी आई-वडिलांची नव्हती आता मात्र ती आई-वडिलांची जबाबदारी झाली आहे. आणि ह्याला मुले नाही तर आई-वडिलच जबाबदार आहेत. सहाजिकच त्यामुळे लहान वयात, आपल्या तर सोडाच, पण इतरही  कुठल्या मुलांनी काम करणे आपल्याला नैतिक दृष्ट्या साफ नामंजुर असते. 

ह्याच विचाराला सुरुंग लावत भारतीच्या शाळांमधून येणारी मुले दिवसभर शाळांमधुन डांबली जात नाहीत. काही तास ती शिकतात आणि मग आपापल्या कामाला निघून जातात, जे काम त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आवश्यक आहे त्या कामाला ती लागतात. कारण गरीब कुटुंबात प्रत्येकाने उदरनिर्वाहासाठी कष्ट करणे आवश्यक असते. मुलांना शाळेच्या वाटेला लावायचे म्हणजे त्याचे काम बंद ही त्या लोकांच्या दृष्टीने चैन आहे जी गरीब कुटुंबाला परवडणारी नसते. एकेकदा सत्य स्विकारण्यासाठी मोठीच मोडतोड करावी लागते.

शिक्षणाने आपण नेमके काय साधतो ? आजवर शिकलेले किती आणि कुठले विषय आपल्या पुढल्या आयुष्याला उपयोगी ठरले आहेत ? मुळात शिक्षण म्हणजे मुलाने नेमके काय शिकायला हवे ? एकाच प्रकारचे सरधोपट शिक्षण प्रत्येक मुलाला देणे आवश्यक आहे का ? त्यामुळे तो जगायला लायक होतो का? शहरातून उच्चवर्गिय मुले शिकतात तेच शिक्षण गावागातल्या मुलांना देणे योग्य आहे का? शिक्षण ग्रहण करण्यात मुलांच्या पोषणाचा, मेंदूच्या विकासाचा थेट संबंध असतो त्यामुळे जे विषय शहरी उच्चवर्गिय मुले ग्रहण करु शकतात ते गावाकडची आर्थिक निम्नस्तरिय मुले ग्रहण करु शकतील का? दहावी-बारावी बोर्डाच्या एकाच धारेतून घालवताना जर मुले कॉपी करुन पास होण्याचा मार्ग स्विकारत असतील तर चुक फक्त मुलांची आहे की राबविलेल्या शिक्षणव्यवस्थेची? शिक्षणपद्धतीचा उभा-आडवा छेद घेत आपल्या शिक्षणपद्धतीत आमुलाग्र बदल करायला हवा आहे का? विशेषत: ग्रामीण भारताला आपल्या अर्थव्यवस्थेशी जोडून घ्यायला आपल्या साचेबंद शिक्षण पद्धतीत बदल करायला हवा आहे का ? बेरोजगारी आणि भरताड शिक्षण हे परस्पर पूरक आहेत, हे कळणे आणि त्यात बदल घडविणे हे जरुरीचे नाही का?   

भारतीच्या शाळांमधली सर्व मुले रोज घरी जातात पण काही जण, ज्यांची इच्छा असेल अशी काही मुले, भारतीच्याकडे लेपाच्या घरात रहात आली आहेत. मुलभूत शिक्षण तर त्यांनाही दिले गेले पण त्या नंतर ह्या मुलांनी व्यवसायभिमुख शिक्षण घेतले. दहावी-बारावीची परिक्षा पास झालेच पाहिजे हा निर्बंध नाही. 

लेपाला भारतीच्या घरी त्या रात्री आम्ही मुलांबरोबर बोलत होतो. होळीच्या दिवसातली छान चंद्राची रात्र. मुलं आमच्याभोवती गोलाकार बसलेली. निशिगंध-मधुमालतीचा सुवास हवेत दरवळत होता. जागा तशी निर्जन पण भीतीदायक नाही. आपण इथे लेपाच्या घरी कसे आलो ते प्रत्येक मुलगा सांगत होता. प्रत्येकाची चित्तरकथा. मुलांमध्ये कुणी घर बांधण्यात प्रविण होते तर कुणी इलेक्ट्रिशियनचे काम करण्यात वाकबगार. कुणी घरातले सर्व सुतारकाम केलेले तर कुणी वेल्डिंगचे काम करुन दिलेले. एवढेच काय, अजय नावाचा एक लहानसर चणीचा मुलगा रहातो तिच्याकडे. भारतीच्या गोशाळेचे सगळे काम, म्हणजे गर्भार गाईची सुटका करण्यापर्यंत सगळे काम अजय एकटा मेहनतीने करतो. 

मनात आले, काय गरज आहे या मुलांना बारावीच्या परिक्षेची? अजय खरंतर उत्तम पशुवैद्य होईल पण पुन्हा त्या शिक्षणासाठी आपल्या मार्गात दहावी-बारावी-नेट-सेट-जेटचे अडसर आहेत. माणसाचा कल महत्वाचा नसतोच. शंकरचे गणित उत्तम आहे, गोलु सगळ्यात वाकबगार आहे. स्वैपाक करण्यापासून आर्थिक व्यवहार पाहण्यापर्यंत भारतीचा डोलारा सांभाळण्यात दिग्विजय भैय्याप्रमाणे त्याचाही महत्वाचा वाटा आहे असे ती कौतुकाने सांगते. मुळात मध्यप्रदेशची माणसे आक्रमक, आक्रस्ताळी नाहीत. सौम्य, मनमिळावु, अतिथ्यशील. त्यातून नर्मदेकाठी राहणारी तर परिक्रमावासियांच्या स्वागताला नेहमीच उत्सुक. आमच्या भोवताली बसलेली ती सर्व मुले इतकी आदबशीर आणि जबाबदार की त्यांचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांचा ताळमेळ घालु लागलो तर चक्रावून जावे. 

भारतीकडे भावना-शिवानी-ट्विंकल-पूजा अशी दहा-बारा वयाच्या मुलींची चौकड आहे. घरातल्या मुलांपेक्षा या मुली सगळ्या लहान आहेत पण एकेकीचे गळे असे गोड की ऐकत रहावे. गाणे भारतीतच आहे त्यामुळे मला वाटते ते सगळ्यांमध्ये उतरले आहे. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला पासुन नर्मदास्तोत्र ते गीतेच्या अठराव्या अध्यायापर्यंत सगळे त्यांना पाठ. हं, सुरु, म्हंटले की कुठेही सुरु होतात. ड्रमवर शिवानी, पेटीवर भावना आणि तबल्यावर त्यांचा दिग्विजय भैय्या. ह्या मुलींचे, त्यांच्या आईचे हाडुस-तुडुस होणारे पूर्वआयुष्य आणि आताचे सरस्वती जिभेवर नांदणारे आयुष्य याला नेमके काय म्हणावे ? भाग्य, नियती, प्रारब्ध की अजुन काही? म्हटलं तर या सगळ्याला शब्द आहेत, म्हंटलं तर आयुष्य एक वाहती नदी. 

भारतीकडेही इथल्या अनुभवांचे भांडार. उग्र रुपाच्या तलवारधारी साधुने तिला आपल्या आश्रमाची जागा कशी दिली, नको असलेल्या गोशाळेची जबाबदारी तिच्याकडे कशी आली ते अगदी अलिकडे भट्यानच्या शाळेपर्यंतचा तिचा सगळाच प्रवास तिच्याच तोंडून ऐकावा असा.

होळीच्या सुमारास चार दिवसांच्या सुट्टीत खास नर्मदेला भेटायला आणि अनुषंगाने भारतीलाही भेटायला महेश्वर-मंडलेश्र्वरला जाणे झाले. लेपाला माझ्या यापूर्वीदेखील फे-या झाल्या होत्या ख-या ,पण भारतीकडे रहायला अशी मी प्रथमच गेले होते. महेश्वरला घाटावर होतो की भारतीचा फोन आला, येताच आहात तर चार-साडेचारपर्यंतच पोचा. म्हणजे दिवसाउजेडी भट्यानची शाळा बघता येईल. ती जागाही खूप छान आहे. तुम्हाला नक्की आवडेल. महेश्वर गाव तसे यथा-तथाच पण अहिल्याबाईंचे घाट आणि नर्मदा म्हणजे जणु विटक्या सुती साडीला भरर्जरी महेश्र्वरी मुलायम पदर. घाटावरुन पाय निघत नाही आणि नर्मदा बघुन मन भरत नाही. भारतीच्या सांगण्यामुळे घाटावरुन लौकरच निघालो. लेपाचा रस्ता नेहमीप्रमाणे चुकत-विचारत तिच्याकडे येऊन पोचलो. गोलु-शंकर, दिग्विजय सगळे अगत्याने भेटले. आम्ही लगेचच भट्यानला पोचलो. 

महेश्वर समोर ठेवून पलिकडच्या तिरावर, जरा उंचावर अशी ही भारतीची भट्यानची शाळा. गावातून आमची गाडी जाताना गावातली सगळी मुलं भरारा आमच्यासोबत शाळेपाशी पोचली. भावना-शिवानी-माधव-ट्विंकल ही सगळी लेपाची बच्चेकंपनी आमच्या बरोबर होतीच. 

भट्यानच्या शाळेशेजारी कुणी एक भुतानचा साधु कुटी बांधुन रहातो. भारतीच्या शाळेच्या प्रवाहात आता तोही सामील झालेला आहे. खूप वर्षांपूर्वी भुतानवरुन निघून जागा शोधत शोधत नर्मदेच्या काठी भट्यानला आला आणि स्थायिक झाला. भट्यानचे गावकरी दिवसभर शेती करतात, नावाड्याचे काम करतात, मोलमजुरी करतात आणि संध्याकाळ झाली की साधुबाबांकडून वेदांत शिकतात. सगळेच अद्भुत. काहीतरी बोलता बोलता साधु बाबा म्हणाले, शिवता शिवता कापड आणि सुई-धागा बाजुला ठेवून उठावे आणि परत येऊन पुन्हा सुई-धागा उचलुन त्याच टाक्यावरुन पुढे टाके घालणे सुरु करावे असा हा जन्म-मृत्यूचा आपला प्रवाह.  

भट्यान, तिथली मुलं, साधुबाबा, नावाडी आणि वेदांत... नर्मदेच्या पाण्यावर सुर्यास्ताचे रंग ! 

नर्मदा ही एक विलक्षण नदी आहे. जो तिच्यापाशी येतो. तो तिच्यात गुंतला नाही असे होत नाही. प्रत्येकाची श्रद्धा नदीपाशी. महाराष्ट्रातल्या नाशिकमधुन येऊन नर्मदा परिक्रमा करता करता नर्मदेच्या विस्थापित गावातल्या निम्नस्तरिय लोकांच्या मुलांसाठी एकटीच्या हिम्मतीवर शाळा चालवणारी भारती खरंच कौतुकास्पद ठरते. 

महाराष्ट्रात तर जागोजाग अशी काम खूपजणं करत आहेत. त्याची माहितीही लोकांपर्यंत पोचते. लेपामधुन निघता निघता भारतीच्या नर्मदालय संस्थेला काय सहयोग देता येईल याचा माझ्या मनात शोध चालु होता. अशा कामांना आर्थिक मदत तर लागतेच. भारतीचे म्हणणे आहे की नर्मदामैय्या करवून घेत आहे, दर महिना काही ना काही होऊन आजवर गेला आहे यापुढेही होईल. 

आर्थिक मदत मिळाली तर हवीच आहे मात्र अजुन एक मदत हवी आहे ती म्हणजे या मुलांना कपडे नाहीत. स्वच्छ, चांगले, सुती कपडे मिळावेत. पैसा, कपडे, खेळणी, धान्य हे तर प्रकल्पांना आवश्यकच आहे. पण अशा कामांना लागते ती माणसांची जोड. तिच्या बोलण्यात ती उणिव  जाणवत होती, माझ्यानंतर किंवा माझ्याबरोबर हा डोलारा कोण सांभाळेल, हा प्रश्र्न !  मी भारतीला म्हंटलं होते की माझ्या काही मित्र-मैत्रीँणीपर्यंत मी हे नक्की पोचवीन - ज्यांची क्षमता आहे शिकवण्याची, जे संवेदनशील आहेत, जे शिक्षणाचा मुलभूत विचार करतात, आपला किमान काही वेळ जे या मुलांना देतील, जमेल तितकी तुला साथ देतील – असे लोक !

तर जनांचा हा प्रवाह मी मध्यप्रदेशात लेपा गावापाशी नेऊन सोडत आहे... 
  
(नर्मदालय – www.narmadalaya.org – email : info@narmadalaya.org – Phone No.9575756141)
राणी दुर्वे
ranidurve@gmail.com    

Monday, January 18, 2016

चर्चासत्र:  इंटरनेट वेब साईट्स्, ब्लॉग्ज आणि अन्य सोशल नेट वर्किंग साईट्स् या आधुनिक माध्यमांतून मराठी भाषा आणि साहित्याचा प्रसार गेल्या दशकापासून होत आहे. अत्यंत कमी खर्चात आणि वेळात इ-मेल, वेब साईट्स्, ब्लॉग्ज आणि अन्य सोशल नेट वर्किंग साईट्स् यातील मराठी मजकूर जगात पसरू शकतो. कोणालाही आपले विचार आणि मते यांच्या अभिव्यक्तीसाठी हे पूर्णपणे लोकशाही व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
या माध्यमांत वापरण्यात येत असलेली भाषा, विषयांचे वैविध्य, तंत्रज्ञानाची व्याप्ती आणि मर्यादा, कायदेविषयक प्रश्न आदी विषयांची दखल साहित्याच्या अभ्यासकांनी आणि संस्थांनी घेतली पाहिजे. अ. भा. साहित्य संमेलनात या विषयांची चर्चा होणे आवश्यक आहे. यासाठी मार्च २०१० मध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनातील एक सत्र  "आधुनिक माध्यम तंत्र न आणि मराठी भाषा व साहित्य" या विषयासाठी राखून ठेवावे अशी सूचना म.सा.प.ची ही कार्यकारिणी करीत आहे. या चर्चासत्राचा तपशील व वक्ते याबाबत अंतिम स्वरुप देण्यासाठी श्री/श्रीमती ............ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी, असा निर्णय ही कार्यकारिणी घेत आहे.

पारितोषिके:  इंटरनेट वेब साईट्स्, ब्लॉग्ज आणि अन्य सोशल नेट वर्किंग साईट्स् या आधुनिक माध्यमांतून मराठी भाषेत ललित आणि वैचारिक साहित्याची निर्मिती मोठया  प्रमाणात होत आहे. या साहित्याची दखल म.सा.प. आणि मराठी महामंडळाच्या संलग्न संस्थांनी घेणे आणि प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने मराठीत केलेल्या वेब साईट्स् आणि ब्लॉग्ज या वरील उत्तम कथा, कविता आणि वैचारिक लेखन आदी प्रकारांना म.सा.प. ने पारितोषिके द्यावी. या विषयीचा तपशील, मापदंड आणि नियम निश्चित करण्यासाठी श्री/श्रीमती ............ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमावी, असा निर्णय ही कार्यकारिणी घेत आहे.
शुद्धलेखन आणि तपशील दुरुस्त करून द्यावा ही विनंती: 
विकीपीडिया: विकीपीडिया या इंटरनेटवरील ज्ञानकोषाच्या विभागात इंग्रजीखेरीज फ्रेंच, रशियन, स्पॅनिश आदी भाषांतून संदर्भ साहित्य मोठया प्रमाणात सातत्याने उपलब्ध होत आहे. त्या तुलनेत भारतीय भाषा मागे आहेत. महाराष्ट्राचे साहित्य, मराठी भाषा, इतिहास, भूगोल आणि अन्य बाबीं संबंधी म.सा.प. ने पुढाकार घेतला पाहिजे. या विषयांवर संदर्भ साहित्य मराठीत निर्माण तर झाले पाहिजेच, पण इंग्रजीतही ते उपलब्ध होणे आवश्यक आहे. या साठी दीर्घ कालिन योजना आखून त्यासाठी निधी आणि संस्थात्मक यंत्रणाही उभी राहाणे आवश्यक आहे. त्यासाठी तपशीलवार योजना आखून महाराष्ट्र शासन, सेवाभावी संस्था, आणि आस्थापने आदींच्या मदतीने ज्ञानकोषाच्या कामाला सुरुवात करावी. अशा उपक्रमात आस्था असणाऱ्या व्यक्ती आणि शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आदी क्षेत्रातील संस्था यांच्या मदतीने म.सा.प. ने या कामास सुरुवात करावी. या साठी पुढील समिती नियुक्त करण्यात येत आहे: .....

Little Nimadi Girls Get Standing Ovation


Indore- The four little singers won standing ovation at the end of their 90 minute performance. Applause continued for several minutes, but the kids did not know importance of the ovation. They were unmindful of the reason why the gathering was giving them accolades; they went about packing their instruments lying around on the stage. They smiled coyly when someone patted their backs and when some others pushed currency notes into their little palms as awards.
These singers were students of third, fourth, and fifth, classes of a school in a socially and economically backward area on the bank of Narmada river in Khargon district of Madhya Pradesh. Their music teachers Shubhada Marathe, and Digvijay Singh, had brought them to Indore, the cultural capital of Madhya Pradesh. Their songs were part of a very important annual function organized by the Madhya Pradesh Marathi Academy on Makar Sankranti.
Their teachers had trained the girls to sing songs in Sanskrit, Hindi, and Marathi although they can converse only in their mother tongue, Nimadi. They sang to the musical notes of harmonium and tabla. Their pronunciation and diction were as clear and chaste as those of elders in elites trained in formal music for years.
Every song fetched them round of applause with increasing crescendo. As their teacher and compère Shubhada Marathe announced that they would perform the last presentation, an elder in the audience queried if the girls could sing some lines in Nimadi. their mother tongue.
Shubhada was not sure. That was because she had not taught them any song in Nimadi during rehearsals for this programmes, or anytime during her training so far. Yet, Bhavana Kevat, the senior most girl in the troupe (10 years) consulted her co-singers only for a few seconds.
Within an instant, along with her, her sister Shivani, Shriya Kewat, and Reva Namdev, burst into a lively Nimadi folk song surprising even their music teachers.Knowledgeable men and women among the audience were ecstatic. That was because, as they later acknowledged, even experienced adult professionals would find difficult to perform with such spontaneity and speed.
That was also because the audience by now had been told about the backgrounds of these little singers. They are students at a Narmadalaya school set up by Nimar Abhyudaya Rural Management And Development Association (NARMADA).
The school is located at Lepa Punarvas,
a settlement for the families of Narmada dam-affected people. Three of the little girls have a troubled family background. The father of Bhavana and Shivani had deserted them and their mother years ago.
The mother is now a maid servant in their school. Reva is daughter of a grocer at nearby Dogava.  The girls do not have any background of training in classical music. They have picked up music from Shubhada who takes the trouble to travel to the school by a public bus to Indore, 130 km away, once or twice a week.
Story of Shriya is more touching. She had lost her eye in a road accident a year ago. Only a week ago, a doctor provided her with an artificial, cosmetic eye. Strangers would not notice that she has only one natural eye. The other, god-gifted eye, enables her to see the world around. She is happy that she can listen to music, learn, and sing what Shubhada teaches her and others in the school.
The singers did not understand the importance of the function where they were lauded. They knew only that it was about a book written originally in Marathi by Bharati Thakur, the founder of their school. Its Hindi version, “Narmada Parikrama, Ek Antaryatra,” translated by Mrs. Mrunalini Ghule and published by Nashik-based Gautami Prakashan, was released for publication after their songs were presented.
The Marathi book, published in 2009, had later led Bharati Thakur to set up the foundation of Nimar Abhyudaya.  The girls are among the 1400 students of Narmadalaya schools in 11 villages in the vicinity of Lepa Punarvas.

Kiran Thakur


--
--


Wednesday, June 16, 2010

नर्मदायात्रीकडून अनमोल सदाव्रत


लोकसत्ता रविवार 13 जून 2010
नर्मदायात्रीकडून अनमोल सदाव्रत
परधर्मसहिष्णुता, आतिथ्यशीलता, आपत्ती झेलण्याची सहनशक्ती, पोटात माया व आपुलकी, पुनर्जन्म संकल्पनेतून व्यक्त झालेली मानवी जीवनाच्या शाश्वतीबद्दलची खात्री हे भारतीय संस्कृतीचे मुख्य मानदंड. हे आणि अशासारखे सगळे आपण नेहमीच वाचतो. पण डोंगरदऱ्यांमधून जंगल वस्त्यांमधून जगणाऱ्या वनवासी भारतीयांच्या रोजच्या जीवनाशी हे कसे पूर्णपणे एकरूप झाले आहे ते कळायचे असेल तर भारती ठाकूरांनी लिहिलेले नर्मदा परिक्रमा- एक अंतर्यात्राहे पुस्तक वाचायलाच हवे. शहरी जीवनातले ताणतणाव, रोजच्या अस्तित्वासाठी चाललेली ससेहोलपट यामुळे दोनच पिढय़ा आधीच्या दैनंदिन आयुष्यक्रमाचा भाग असलेले हे मौलिक संस्कृतीविशेष आता केवळ अंधुक आठवणींच्या रूपात उरले आहेत. आमच्या त्या काळच्या दातृत्वाच्या, त्यागीवृत्तीच्या आणि दुर्दम्य आशावादाच्या संस्कारांचे पुन:स्मरण अत्यंत प्रवाही आणि रंजक रूपकांद्वारे या पुस्तकातून आपल्याला होते.
चित्र रंगवता रंगवता चित्रकार थोडे मागे सरून चित्रांचे पुनरावलोकन करतो. चित्र परिपूर्ण होण्यासाठी त्याचा सतत पुन:विचार, त्याकडे स्वत: तटस्थपणे टीकाकाराच्या चष्म्यातून पाहणे आणि त्यातून निर्दोष कलाविष्काराकडे वळणे ही निर्मितीतली प्रगत अवस्था असते, ‘सखी’  या लेखिकेने कल्पिलेल्या मानससहचरीची काहीशी अशीच असलेली भूमिका या पुस्तकाचे एक खास आकर्षण आहे. पुस्तकभर बाजूने वाहणाऱ्या नर्मदामाईच्या संथ पाण्यावर, लेखिकेच्या परिक्रमेत घडलेल्या प्रसंगांमुळे, भेटलेल्या भल्याबुऱ्या माणसांमुळे अनेक विचारतरंग उभटतात. सखीच्या सटीप पण खुमासदार उद्गारांमुळे त्या तरंगांचे वर्तुळ विस्तारते आणि पुन:प्रसारित होते. बरेच दिवसांनंतर संस्कृतात आणि जुन्या मराठी साहित्यात गाजलेला स्वगतहा साहित्यविशेष या पुस्तकात पुन:पुन्हा भेटतो. निसर्गवर्णनं, प्रवासवर्णनं आणि त्यापलीकडची गोनीदांची अजरामर साहित्यकृती यांनी नर्मदामाईची पूजा बांधलेलीच आहे. त्यात या पुस्तकाला एक अध्यात्मिक बैठकही लाभली आहे. ओघवत्या शैलीत आणि रोजच्या उदाहरणांमधून सूचक अशा विचारांना, योग्यायोग्य काय त्याच्या निर्देशाला संग्राह्य़ स्वरूप मिळालेले आहे. जीवनदर्शी बोधचित्रांनी ते सजवले आहे.
लेखिकेला अनेक वर्षांची त्यागमय, निर्मोही, करारीपण मृदू अशा स्वभावाची पाश्र्वभूमी मिळाली आहे, नव्हे तिनेच ती निग्रहाने व निश्चयाने मिळवली आणि सिद्ध केली आहे.
प्रत्ययकारी संस्कृत, इंग्रजी, हिंदी आणि मराठी साहित्य वाचून परिपक्व झालेले मन, त्याहून महत्त्वाचे म्हणजे मनाला पटेल तसा स्वत:चा जीवनपट लिहून तसे जीवन जगण्याची मनस्वी जिद्द यामुळे एकीकडे कलासक्त, त्याबरोबरच लहानपणापासून पहाटे स्तोत्रपठनात वंदे मातरमहे राष्ट्रगीत म्हणण्याची शिस्त असे हे अभूतपूर्व रसायन आहे. स्वच्छ पारदर्शी काचेतून अनेक पैलू असलेला स्फटिक घडवला तर त्यात शिरणाऱ्या प्रत्येक तेजाच्या किरणांचा अनेकरंगी विस्फोट होतो. सर्वदूर सप्तरंगांची पखरण होते. लेखिकेच्या लिखाणात नर्मदा परिक्रमेच्या निमित्ताने विचारमंथन करताना अशीच काहीशी किमया झालेली दिसते.
नद्यांच्या पुराच्या पाण्याचे नियोजन आणि त्यामुळे झालेला संस्कृती विध्वंस हा नेहमीच एक लोकक्षोभाचा विषय झालेला आहे. कंबोडिया, भारत, इजिप्त, चीन, द. मेक्सिको अशांसारख्या प्राचीन संस्कृतींमध्ये फिरणारे मानवनिर्मित धरणे व कालव्यांच्या संदर्भात निर्मिती-विनाशाचे हे कालचक्र सर्वपरिचित आहे. चीनच्या पूर्ण झालेल्या तीन खोऱ्यांच्याजगड्व्याळ प्रकल्पात त्यांच्या तीस अतिप्राचीन संस्कृतीचे जलसमर्पण झाले. बेताच्या आर्थिक परिस्थितीतल्या या लोकबहुल देशाने उणीपुरी तीस वर्षे या परिस्थितीचा साधकबाधक ऊहापोह केला आणि शेवटी आर्थिक सत्यापुढे मान टाकली. काहीही वाचवता आले नाही.. मोजक्या स्मारकांखेरीज.
लेखिकेने जलार्पण होणाऱ्या (आता बुडालेल्या) गावांबद्दल, जंगलांबद्दल, शेती आणि जनावरांच्या एकूणात जवळून पाहिलेल्या सर्व संपन्न संस्कृती विनाशाबद्दल मनात झालेली कालवाकालव व्यक्त केली आहे. यापुढे वाढून ठेवलेले संकट असे की, मागे उरलेल्यांना बुडालेल्या सर्वाचा, त्यांच्या आतिथ्यशील मृदू, ऋजू स्वभावाचा, त्यांच्या अत्मसंतुष्ट पण मानी स्वभावाचा विचारपूर्वक खर्च करण्याचा विसर पडला तर वाचवण्यासारखी अनेक जीवनमूल्ये होत्याची नव्हती होतील आणि त्याचे परिणाम दूरगामी असतील.
असा त्यांचा विसर पडू नये असे वाटत असेल, तर या आणखी यासारख्या इतर प्रत्ययी पुस्तकांचा इतर भाषांमध्ये, इतर संस्कृतीमध्ये प्रसार व्हायला हवा. पुढच्याला बसलेली ठेच किती जिव्हारी बसली त्याचे प्रभावी चित्रण तर या पुस्तकात आहेच, पण अशा साहित्यकृतींमध्ये पुढच्याला शहाणपण सुचवण्याचे ऐतिहासिक कर्तव्य पार पाडण्याचे सामथ्र्य आहे.
नर्मदा परिक्रमा- एक अंतर्यात्रा
भारती ठाकूर
गौतमी प्रकाशन
पृष्ठे- २६१, मूल्य- २०० रुपये
शशिकांत जागीरदार

Wednesday, November 25, 2009

सर्व प्रवास वाचनीयच आहे: अशोक कोठावळे

अशोक कोठावळे
महाराष्ट्र टाइम्स सहा सप्टेम्बर २००९ 
नर्मदा परिक्रमेची परंपरा आपल्या देशात फार प्राचीन काळापासून चालत आली आहे. साधू, संत, ऋषी, मुनी यांनी आध्यात्मिक/धामिर्क कार्यासाठी ही परिक्रमा केली. नर्मदेची परिक्रमा केल्याने तिच्या सान्यिध्यात पाप वृत्तींचा नाश होतो, अशी एक पारंपरिक समजूत आहे. या समजुतीचा आधार घेऊन काही लोक ही परिक्रमा करीत असतात, तर काही लोक नर्मदेचा सुंदर किनारा, किनाऱ्यावरची जंगलं, विस्तीर्ण होत जाणारे नर्मदेचे पात्र आणि परिक्रमा करीत असताना सातत्याने भेटणाऱ्या सामान्य जनतेची आतिथ्यशीलता या अनुभवांसाठीही जात असतात. ही परिक्रमा करीत असताना सर्वसामान्य व्यक्तीलाही चमत्कार वाटावेत, असे काही अनुभव येत असतात. अशा अनुभवांसाठीही ही नर्मदा परिक्रमा काही वेळा केली जाते. मार्कंडेय ऋषींनी सर्वात प्रथम नर्मदा परिक्रमा केली असं मानलं जातं. नर्मदेचं वर्णन अगदी प्राचीन काळापासून लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. 
स्कंदपुराणात नर्मदेचं वर्णन आढळतं. अलीकडच्या साहित्यात 'माते नर्मदे' हे दत्तप्रसाद दाभोलकर यांचं नर्मदा परिक्रमेवरचं पुस्तक अतिशय गाजलं. ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दाण्डेकर यांचं 'कुणा एकाची भ्रमणगाथा' हे नर्मदा परिक्रमेवरचं पुस्तक म्हणजे त्यांनी या परिक्रमेच्या काळात आत्मशोधाचा केलेला प्रयत्न वाटतो. वास्तवाला ललित रूप देऊन त्यांनी नर्मदा परिक्रमेतले आपले अनुभव मांडले आहेत. सत्याच्या, चिरंतनाच्या शोधासाठी केलेला हा प्रवास आहे. या परिक्रमेत नर्मदेचे पाणी 'अतिदेखणे' वाटते. खोल विस्तीर्ण पात्र आपले क्षुदत्व दाखवून देते. देवळे, लोक, संस्कृती यातून साक्षीभावाने वाहणाऱ्या नर्मदेचे विशाल रूप आपणांस या कादंबरीतून दिसते. या नर्मदा परिक्रमेत लेखकाला भेटलेली 'यशोदा' कोण विसरू शकेल? गोनीदांच्या रसाळ शैलीमुळेही ही कादंबरी अतिशय भावते.
जगन्नाथ कुंटे यांचे 'नर्मदे हर हर' हे पहिल्या तीन नर्मदा परिक्रमांवरील आणि 'साधनामस्त' हे चौथ्या परिक्रमेवरील अशी दोन पुस्तकं सध्या उपलब्ध आहेत. अतीव आंतरिक आचेमुळे आपण ही परिक्रमा केली, असे कुंटे यांनी पुस्तकात नमूद केले आहे. ध्यान, प्राणायाम यांना त्यांनी आपल्या या परिक्रमेत महत्त्व दिले आहे. गुरुकृपेमुळे उच्च कोटीचे अनुभव प्राप्त करतात येतात, असा त्यांचा विश्वास आहे. त्यांच्याशी गुरुमाऊली बोलतात, नर्मदामाई त्यांना आज्ञा करते, चमत्कार वाटावेत असे अनुभव ते घेतात, या परिक्रमेत अश्वत्थामा त्यांना भेटतो, हे सगळे अनुभव इतरांना थापा वाटतील, असंही त्यांनी नमूद केलं आहे. पण गूढ, अर्तक्य वाटतील असे अनेक अनुभव ते या परिक्रमेच्या दरम्यान अनुभवतात. परिक्रमावासीयांचे जीवन, वेगवेगळ्या वृत्ती-प्रवृत्तींची भेटलेली माणसे, जंगलदऱ्यांतून प्रवास करताना आलेले अनुभव, कष्ट, लूटमारीला तोंड देणे अशा अनेक गोष्टींची ओळख ते या दोन पुस्तकांतून आपणांस करून देतात. ही परिक्रमा एक साधना, व्रत म्हणून ते करतात. अतिशय विलक्षण अनुभव देणारी नर्मदा परिक्रमेवरील ही दोन पुस्तके वाचकालाही अनुभवसमृद्ध करतात.
'नर्मदा परिक्रमा : एक अंतर्यात्रा' हे भारती ठाकूर यांचं अलीकडचं पुस्तक. स्वत: लेखिका भारती ठाकूर, निवेदिता खांडेकर आणि उष:प्रभा पागे या तीन मैत्रिणींनी केलेल्या या पदयात्रेतील काही ठळक नोंदींवर आधारित आहे. ही पदयात्रा करताना त्यांनी पाहिलेला/अनुभवलेला निसर्ग, त्यांना भेटलेली माणसं, त्यांनी केलेलं सहकार्य, या प्रवासातील महत्त्वाच्या घटना, प्रसंग यांविषयीचं लेखन इथे येतं. या पुस्तकाच्या मनोगतात लेखिकेनं म्हटलं आहे की, 'निसर्ग-अर्थात नर्मदा खोऱ्यातलं पर्यावरण याखेरीज आणखी काही कारणं (माझ्या नर्मदा परिक्रमेला) होती. तिथलं लोकजीवन बघता यावं, आणि नर्मदा किनाऱ्यावरून मार्गक्रमणा करत असताना स्वत:चा स्वत:शीच संवाद घडावा ही त्यांपैकी आनुषंगिक कारणं. पण या साऱ्या कारणांचा मी नर्मदा परिक्रमेहून परतल्यानंतर पुन्हा विचार करते तेव्हा हीच कारणं मला सबबी वाटू लागतात. नर्मदा परिक्रमेची इच्छा ही केवळ एक अंत:प्रेरणा होती- तो योग माझ्या भाग्यात होता हेच खरं.''
नर्मदा परिक्रमा करीत असताना देहाला अतिशय कष्ट पडतात. फार सामान वाहून नेऊ शकत नाही, त्यामुळे सदाव्रत (शिधा मागणे) मागूनच उदरनिर्वाह करावा लागतो. अर्थात शहरी संस्कार झालेल्या तिघींना सुरुवातीला हे सर्व अवघड वाटलं. पण नंतर त्यातली अपरिहार्यताही लक्षात घ्यावी लागली. नर्मदा किनाऱ्यावरचे शेतकरी, आदिवासी अगदी किनाऱ्यावरचे नावाडीही हे सदाव्रत देतात. ज्यांच्या घरात दुसऱ्या दिवसाची भ्रांत असायची तेही आनंदाने सदाव्रत देतात. स्वामी अर्ध्यानंदानी लेखिकेला त्यांचा सदाव्रत स्वीकारण्यातला संकोच घालविण्यासाठी सांगितलं ते असं की, 'तुम्ही ज्याला भिक्षा मानता त्याला ती देणारा सदाव्रत मानतो. ते घेताना तुम्हाला भलेही संकोच वाटो, देणाऱ्याला मात्र आनंद होत असतो. 'वसुधैव कुटुंबक्रम'चा अनुभव तुम्ही या प्रथेतून घेत असता. मी, माझी सांपत्तिक स्थिती, शिक्षण, सामाजिक प्रतिष्ठा... वगैरे जो अहंभाव मनात असतो, तो गळून पडण्यास या प्रथेनं मदत होते.
नर्मदेची विविध रूपं या पुस्तकातून त्या त्या नोंदीच्या रूपानं उलगडली आहेत. माणुसकीची विविध रूपं या प्रवासात त्यांना अनुभवायला मिळाली. चमत्कार अनुभवायला आले नाहीत, पण नर्मदातीरी प्रकट केेलेली इच्छा पूर्ण होते, याचा अनुभव त्यांना बऱ्याचदा येतो. एखादी गोष्ट हवीशी वाटणं आणि पुढल्या प्रवासात ती मिळणं असं बऱ्याचदा घडतं.
हा प्रवास निश्चितच सहजसाध्य नाही. पण उत्कट इच्छेनं सर्व अडचणींवर मात केली. रस्ता अत्यंत कठीण-जंगलातून जाणारा, निर्मनुष्य, खडबडीत. वस्तीसाठी एखाद्या आश्रमात, धर्मशाळेत अगदी एखाद्या अडगळीच्या खोलीतही मुक्काम करावा लागणं, तीन स्त्रियांनीच मिळून केलेला हा प्रवास किती धाडसी आणि कसोटी पाहणारा वाटू शकेल याचा प्रत्यय इथे येत राहतो. मात्र या परिक्रमेत कुठलेही विपरीत वाट्याला न येता, ही नर्मदा परिक्रमा सफळ, संपूर्ण होते. एक नवा अनुभव त्यांना देते.
हा सर्व अनुभव लेखिकेनं सखीशी केलेल्या हितगुजाच्या स्वरूपात मांडला आहे. हे हितगुज म्हणजे लेखिकेचा अंतर्मनाशी झालेला संवाद आहे. या सखीच्या रूपाने जे हितगुज लेखिका करते, त्यातून तिच्या समृद्ध व्यक्तिमत्त्वाचाही अनुभव आपण घेतो. हा सर्व प्रवास वाचनीयच आहे.

नर्मदा परिक्रमा : एक अंतर्यात्रा - भारती ठाकूर, गौतमी प्रकाशन, नाशिक, पृष्ठे २६१, मूल्य : २०० रुपये.

Thursday, November 19, 2009

Bharati’s book motivates us to undertake the parikrama

Z_©Xm n[aH«$_m-EH$ A§V`m©Ìm

nwñVH$ n[aM`, वनस्थली, दिवाली विशेषांक, २००९, पुणे  

d¥fmbr nQ>dY©Z

Ia§ Va ho "nwñVH$-narjU' Zmhr. ^maVr R>mHy$a `m§Zr {b{hbob§ "Z_©Xm n[aH«$_m-EH$ A§V`m©Ìm'ho nwñVH$ dmMë`mda _bm H$m` dmQ>b§-H$m` ^mdb§ ho eãXmV _m§S>Ê`mMm hm àm_m{UH$ à`ËZ Amho. Z_©Xm n[aH«$_o~Ôb AmUIr XmoZ nwñVH§$ `mAmYr dmMbr hmoVr. Ë`m_wio `mV ZdrZ H$m` AgUma? Aer e§H$m hmoVr. nU nwñVH$ nm{hë`mda Vo bJoM hmVmV KoD$Z MmiÊ`mMm Am{U Z§Va Vo PnmQ>çmZ§ dmMyZ nyU© H$aÊ`mMm _moh Q>miVmM Ambm Zmhr. AJXr erf©H$mnmgyZM gwé H$am`M§ Va-erf©H$ gwÕm Iyn H$mhr gm§JyZ OmUma§ Amho. Z_©Xm n[aH«$_m A{Ve` IS>Va Agbr Var ~aoMOU hr n[aH«$_m H$aÊ`mMm à`ËZ H$aVmZm

{XgVmV. Ë`m_mJo AÜ`mË_, lÕm, Am§V[aH$ AmoT>, gmhg, H$mhrVar doJi§-AdKS> Jmoï> Ho$ë`mM§ g_mYmZ {_idU§

Ago CÔoe Agy eH$VmV. nU ^maVrVmBªZr åhQ>ë`mà_mUo Ë`m§Mr Z_©Xm n[aH«$_m hr EH$ "A§V`m©Ìm' R>amdr. Ë`m§À`m `m A§V`m©ÌoV AmnUhr Ë`m§Mo ghO ghàdmgr hmoD$Z OmVmo. Ë`m§Mo gJio AZw^d Ë`m§À`m~amo~a KoV OmVmo. `mM§ H$maU Ë`m§Mr A{Ve` ghO-gw§Xa, AmoKdVr àm_m{UH$ ^mfm. Ë`mV eãXm§M§ Hw$R>ohr _wÔm_ AdS>§~a Zmhr. ~è`mM {R>H$mUr

doXCn{ZfXm§Mm MnIb g§X^© Ë`mÀ`m gmoß`m _amR>rVë`m AWm©_wio AmZ§X XoD$Z OmVmo. g§V VwH$mam_m§Mo A^§J,

H$~raXmgm§Mo Xmoho, ~{hUm~mBªÀ`m H${dVm, nmS>JmdH$am§À`m H${dVm, BVH§$M Zìho Va ^maVrVmBªÀ`m d{hZtÀ`m gmÜ`m g§gmar AmB©À`m CËñ\y$V© Amoì`m- `m gJù`m Jmoï>r ^maVrVmBªZm doimodoir AmR>dVmV. Ë`mVyZ Ë`m Amnë`mbm Oo gm§Jm`M§ Vo Amnë`mn`ªV WoQ> nmohmoMdVmV.

Ë`m§À`m `m n[aH«$_oV Ë`m§À`m XmoZ _¡{ÌUr. Á`oð> {J`m©amohH$ Cf…à^m nmJo Am{U nÌH$ma {Zdo{XVm Im§S>oH$a Ë`m§À`m~amo~a hmoË`m. nU _bm OmñV AmdS>br Ë`m§À`m "A§V`m©Ìo'V Ë`m§À`m~amo~a AgUmar-"gIr' OUy Ë`m§M§ A§V_©Z! hr "gIr' Ë`m§Zm doimodoir Q>moH$Vo-WmondVo-gmdY H$aVo. H$Yr H$Yr Iyn N>mZ VÎdkmZ ghO gm§JyZ OmVo. Z_©Xm n[aH«$_m H$aVmZm dmQ> MwH$m`bm bmJb§ Va H$moUr Zm H$moUr ^oQ>V§. _mJ©Xe©Z H$aV§ Ag§ åhUVmV. A§JmaoídamhÿZ AmoOH$S>o OmUmè`m dmQ>oda Ë`m§Zm hr AZw^d Ambm. nU lÜXm-A§YlÜXm `m dmXmV Z AS>H$Vm Ë`m§À`m "gIrZ§' `m _XVrÀ`m "M_ËH$ma' eãXmda Amjon KoV åhQ>b-"M_ËH$ma

eãXmEoOdr _mUwgH$sMm na_mZw^d åhU. hr ZdrZ dfm©Mr ^oQ> Zmhr, Zddfm©V Vy {eH$bobm hm n{hbm YS>m Amho.'

^maVrVmBªMr hr "gIr' dmMH$m§À`mhr "gIr'bm ZŠH$sM gmX KmbVo!

ñdm_r {dO`mZ§Xm§À`m Aml_mVë`m ^oQ>r g§X^m©V Ë`m§Zr F$½doXmVbm "hmVm§' ~m~VMm íbmoH$ gm§{JVbm`-Ë`mMm hr _amR>r AZwdmX Ho$di Aà{V_!(n¥.27).

Z_©Xm n[aH«$_o_mJMr ^maVrVmBªMr ^y{_H$m ñnï> hmoVr. Ë`mV AÜ`mpË_H$Vonojm Aä`mgmMr ^mdZm OmñV hmoVr Ag§ dmQ>V§. Ë`m_wioM Ë`m§À`m `m g§nyU© n[aH«$_m _mJm©V Ë`m§Zr {OWo {OWo _wŠH$m_ Ho$bm {VWë`m bmoH$OrdZmM§, Hw$Qw>§~m§M§, Hw$Qw>§~mVë`m bmoH$m§À`m nañna ZmVog§~§Ym§M§ Ë`m§Zr gwaoI {MÌU Ho$b§`. Vohr ghOnUo.

Ë`m n[agamVbm gm_mÝ` g_mO, Ë`m§Mr {dMmagaUr, lÕmñWmZ§, Hw$Qw>§~mVë`m _wbr Am{U pñÌ`m§M§ ñWmZpñWVr AZoH$ àg§Jm§_YyZ Ë`m ZoQ>Ho$nUmZ§ _m§S>VmV. n[aH«$_m H$aUmè`m§Zm "gXmd«V' H$éZ {^jm _mJyZ amhmd§ bmJV§. Amnbo gJio gm_m{OH$, Am{W©H$, e¡j{UH$ g§X^© _mJo gmoSy>Z [^jm _mJU§ `mV Ah§H$ma H$gm JiyZ nS>Vmo Vohr Ë`m gm§JVmV-"gIr'~amo~a

"eoAa' H$aVmV! AerM dmQ>oV ^oQ>bobr "eer' ZmdmMr A{e{jV ñÌr Ë`m§À`m {dMmam§Zm doJirM MmbZm XoVo. gwI Xþ…ImM§ _mn àË`oH$mÀ`m VamOyV doJdoJi§ H$m AgV§?-gIr _XVrbm YmdyZ `oVo-

Life is not a problem to be solved

A question to be answered,

It is a mystery to be comtemplated,

Wondered at and solved



Am`wî`mdaM§ ho CÎm_ ^mî` `m nwñVH$mMr C§Mr gm§JV§! AZoH$ àg§Jm§_YyZ, C"oIm§_YyZ Ë`m§M§ {ZgJ©ào_, n`m©daUdmXr Ñ{ï>H$moU {XgyZ `oVmo. {H$VrVar nú`m§Mr ZmdmgH$Q> ~maH$mB©Z§ Ho$bobr dU©Z§ Ë`mM§ àË`§Va XoVmV. Z_©Xm_mB© daÀ`m YaUm_wio {dñWm{nV

hmoUmè`m§Mm àíZ Ë`m§Zm AñdñW H$aVmo. n[aH«$_ogmR>r H$mhr _{hÝ`m§gmR>r Amnb§ Ka gmoSy>Z OmVmZm _ZmV H$mbdmH$mbd hmoVo, Va Ë`m YaUJ«ñVm§M§ H$m`? Agm ghO ^md Ë`m ì`ŠV H$aVmV.

nwñVH$mV eodQ>r "Z_©Xm CËnÎmr H$Wm' Amho. nwamUmMo XmIbo XoD$Z ^maVrVmBªZr hr H$Wmhr gw§Xa _m§S>br Amho. hm g§X^© `m nwñVH$mM§ d¡{eîQ>ç R>amd§. "Z_©Xm_mB©'bm An©U-n{ÌH$m gmXa H$aVmZmM ^maVrVmBªZr `m nwñVH$mM§ gma, CÔoe gm§{JVbm` Am{U eodQ>r hr "gIr'H$Sy>Z Amnë`mbm gm§{JVb§` H$s "hr n[aH«$_m Zìho, hr Va A§V`m©Ìm-H$_©`moJmÀ`m _mJm©da

gmYZoMr AI§S> Á`moV öX`mV VodV R>odUmar.. H$Yrhr Z g§nUmar.'

ho nwñVH$ dmMyZ _mÂ`mgma»`m gm_mÝ` J¥{hUrÀ`m _ZmV-"AmnUhr `m n[aH«$_m _mJm©da Amnë`mbm O_ob {VVH$m àdmg H$éZ AZoH${dY AZw^dm§Mr {eXmoar JmR>rer ~m§Ymdr' Agm {dMma Ambm-g_n©H$ _wIn¥ð>, CÎm_ N>nmB©, gw§Xa {MÌ, CËH¥$ï> Q>mB©n, nwñVH$ {dH$V KoD$Z dmMmd§ BVH$s _m\$H$ qH$_V, `m ì`mdhm[aH$ ~mOyhr O_oÀ`mM AmhoV. nU Ë`mV Ambobo {d{dY àg§J-Ë`mdaM§ bo{IHo$M§ ^mî` dmMH$mbm gwÕm ZH$iV {dMma H$am`bm bmdV§-

Vwåhr ho nwñVH$ dmMb§V Va ^maVr R>mHy$a `m§M§ ho n{hb§M nwñVH$ Amho, `mda Vw_Mmhr {dídmg ~gUma Zmhr. bo{IHo$Mr Z_©Xm n[aH«$_oÀ`m {Z{_ÎmmZ§ gwé Pmbobr "A§V`m©Ìm' Amnë`mhr "gIr'~amo~aÀ`m "A§V`m©Ìo'bm gwédmV H$éZ XoVo ho `m nwñVH$mM§ gdm©V _moR>§ `e!



Z_©Xm n[aH«$_m…EH$ A§V`m©Ìm

bo{IH$m - ^maVr R>mHy$a

àH$meH$ - Jm¡V_r àH$meZ

n¥ð>o - 261, _wë` - 200 é.

nwñVH$ n[aM`- d¥fmbr nQ>dY©Z

"ea`w', nÌH$ma ZJa, nwUo-16