Wednesday, November 25, 2009

सर्व प्रवास वाचनीयच आहे: अशोक कोठावळे

अशोक कोठावळे
महाराष्ट्र टाइम्स सहा सप्टेम्बर २००९ 
नर्मदा परिक्रमेची परंपरा आपल्या देशात फार प्राचीन काळापासून चालत आली आहे. साधू, संत, ऋषी, मुनी यांनी आध्यात्मिक/धामिर्क कार्यासाठी ही परिक्रमा केली. नर्मदेची परिक्रमा केल्याने तिच्या सान्यिध्यात पाप वृत्तींचा नाश होतो, अशी एक पारंपरिक समजूत आहे. या समजुतीचा आधार घेऊन काही लोक ही परिक्रमा करीत असतात, तर काही लोक नर्मदेचा सुंदर किनारा, किनाऱ्यावरची जंगलं, विस्तीर्ण होत जाणारे नर्मदेचे पात्र आणि परिक्रमा करीत असताना सातत्याने भेटणाऱ्या सामान्य जनतेची आतिथ्यशीलता या अनुभवांसाठीही जात असतात. ही परिक्रमा करीत असताना सर्वसामान्य व्यक्तीलाही चमत्कार वाटावेत, असे काही अनुभव येत असतात. अशा अनुभवांसाठीही ही नर्मदा परिक्रमा काही वेळा केली जाते. मार्कंडेय ऋषींनी सर्वात प्रथम नर्मदा परिक्रमा केली असं मानलं जातं. नर्मदेचं वर्णन अगदी प्राचीन काळापासून लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. 
स्कंदपुराणात नर्मदेचं वर्णन आढळतं. अलीकडच्या साहित्यात 'माते नर्मदे' हे दत्तप्रसाद दाभोलकर यांचं नर्मदा परिक्रमेवरचं पुस्तक अतिशय गाजलं. ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दाण्डेकर यांचं 'कुणा एकाची भ्रमणगाथा' हे नर्मदा परिक्रमेवरचं पुस्तक म्हणजे त्यांनी या परिक्रमेच्या काळात आत्मशोधाचा केलेला प्रयत्न वाटतो. वास्तवाला ललित रूप देऊन त्यांनी नर्मदा परिक्रमेतले आपले अनुभव मांडले आहेत. सत्याच्या, चिरंतनाच्या शोधासाठी केलेला हा प्रवास आहे. या परिक्रमेत नर्मदेचे पाणी 'अतिदेखणे' वाटते. खोल विस्तीर्ण पात्र आपले क्षुदत्व दाखवून देते. देवळे, लोक, संस्कृती यातून साक्षीभावाने वाहणाऱ्या नर्मदेचे विशाल रूप आपणांस या कादंबरीतून दिसते. या नर्मदा परिक्रमेत लेखकाला भेटलेली 'यशोदा' कोण विसरू शकेल? गोनीदांच्या रसाळ शैलीमुळेही ही कादंबरी अतिशय भावते.
जगन्नाथ कुंटे यांचे 'नर्मदे हर हर' हे पहिल्या तीन नर्मदा परिक्रमांवरील आणि 'साधनामस्त' हे चौथ्या परिक्रमेवरील अशी दोन पुस्तकं सध्या उपलब्ध आहेत. अतीव आंतरिक आचेमुळे आपण ही परिक्रमा केली, असे कुंटे यांनी पुस्तकात नमूद केले आहे. ध्यान, प्राणायाम यांना त्यांनी आपल्या या परिक्रमेत महत्त्व दिले आहे. गुरुकृपेमुळे उच्च कोटीचे अनुभव प्राप्त करतात येतात, असा त्यांचा विश्वास आहे. त्यांच्याशी गुरुमाऊली बोलतात, नर्मदामाई त्यांना आज्ञा करते, चमत्कार वाटावेत असे अनुभव ते घेतात, या परिक्रमेत अश्वत्थामा त्यांना भेटतो, हे सगळे अनुभव इतरांना थापा वाटतील, असंही त्यांनी नमूद केलं आहे. पण गूढ, अर्तक्य वाटतील असे अनेक अनुभव ते या परिक्रमेच्या दरम्यान अनुभवतात. परिक्रमावासीयांचे जीवन, वेगवेगळ्या वृत्ती-प्रवृत्तींची भेटलेली माणसे, जंगलदऱ्यांतून प्रवास करताना आलेले अनुभव, कष्ट, लूटमारीला तोंड देणे अशा अनेक गोष्टींची ओळख ते या दोन पुस्तकांतून आपणांस करून देतात. ही परिक्रमा एक साधना, व्रत म्हणून ते करतात. अतिशय विलक्षण अनुभव देणारी नर्मदा परिक्रमेवरील ही दोन पुस्तके वाचकालाही अनुभवसमृद्ध करतात.
'नर्मदा परिक्रमा : एक अंतर्यात्रा' हे भारती ठाकूर यांचं अलीकडचं पुस्तक. स्वत: लेखिका भारती ठाकूर, निवेदिता खांडेकर आणि उष:प्रभा पागे या तीन मैत्रिणींनी केलेल्या या पदयात्रेतील काही ठळक नोंदींवर आधारित आहे. ही पदयात्रा करताना त्यांनी पाहिलेला/अनुभवलेला निसर्ग, त्यांना भेटलेली माणसं, त्यांनी केलेलं सहकार्य, या प्रवासातील महत्त्वाच्या घटना, प्रसंग यांविषयीचं लेखन इथे येतं. या पुस्तकाच्या मनोगतात लेखिकेनं म्हटलं आहे की, 'निसर्ग-अर्थात नर्मदा खोऱ्यातलं पर्यावरण याखेरीज आणखी काही कारणं (माझ्या नर्मदा परिक्रमेला) होती. तिथलं लोकजीवन बघता यावं, आणि नर्मदा किनाऱ्यावरून मार्गक्रमणा करत असताना स्वत:चा स्वत:शीच संवाद घडावा ही त्यांपैकी आनुषंगिक कारणं. पण या साऱ्या कारणांचा मी नर्मदा परिक्रमेहून परतल्यानंतर पुन्हा विचार करते तेव्हा हीच कारणं मला सबबी वाटू लागतात. नर्मदा परिक्रमेची इच्छा ही केवळ एक अंत:प्रेरणा होती- तो योग माझ्या भाग्यात होता हेच खरं.''
नर्मदा परिक्रमा करीत असताना देहाला अतिशय कष्ट पडतात. फार सामान वाहून नेऊ शकत नाही, त्यामुळे सदाव्रत (शिधा मागणे) मागूनच उदरनिर्वाह करावा लागतो. अर्थात शहरी संस्कार झालेल्या तिघींना सुरुवातीला हे सर्व अवघड वाटलं. पण नंतर त्यातली अपरिहार्यताही लक्षात घ्यावी लागली. नर्मदा किनाऱ्यावरचे शेतकरी, आदिवासी अगदी किनाऱ्यावरचे नावाडीही हे सदाव्रत देतात. ज्यांच्या घरात दुसऱ्या दिवसाची भ्रांत असायची तेही आनंदाने सदाव्रत देतात. स्वामी अर्ध्यानंदानी लेखिकेला त्यांचा सदाव्रत स्वीकारण्यातला संकोच घालविण्यासाठी सांगितलं ते असं की, 'तुम्ही ज्याला भिक्षा मानता त्याला ती देणारा सदाव्रत मानतो. ते घेताना तुम्हाला भलेही संकोच वाटो, देणाऱ्याला मात्र आनंद होत असतो. 'वसुधैव कुटुंबक्रम'चा अनुभव तुम्ही या प्रथेतून घेत असता. मी, माझी सांपत्तिक स्थिती, शिक्षण, सामाजिक प्रतिष्ठा... वगैरे जो अहंभाव मनात असतो, तो गळून पडण्यास या प्रथेनं मदत होते.
नर्मदेची विविध रूपं या पुस्तकातून त्या त्या नोंदीच्या रूपानं उलगडली आहेत. माणुसकीची विविध रूपं या प्रवासात त्यांना अनुभवायला मिळाली. चमत्कार अनुभवायला आले नाहीत, पण नर्मदातीरी प्रकट केेलेली इच्छा पूर्ण होते, याचा अनुभव त्यांना बऱ्याचदा येतो. एखादी गोष्ट हवीशी वाटणं आणि पुढल्या प्रवासात ती मिळणं असं बऱ्याचदा घडतं.
हा प्रवास निश्चितच सहजसाध्य नाही. पण उत्कट इच्छेनं सर्व अडचणींवर मात केली. रस्ता अत्यंत कठीण-जंगलातून जाणारा, निर्मनुष्य, खडबडीत. वस्तीसाठी एखाद्या आश्रमात, धर्मशाळेत अगदी एखाद्या अडगळीच्या खोलीतही मुक्काम करावा लागणं, तीन स्त्रियांनीच मिळून केलेला हा प्रवास किती धाडसी आणि कसोटी पाहणारा वाटू शकेल याचा प्रत्यय इथे येत राहतो. मात्र या परिक्रमेत कुठलेही विपरीत वाट्याला न येता, ही नर्मदा परिक्रमा सफळ, संपूर्ण होते. एक नवा अनुभव त्यांना देते.
हा सर्व अनुभव लेखिकेनं सखीशी केलेल्या हितगुजाच्या स्वरूपात मांडला आहे. हे हितगुज म्हणजे लेखिकेचा अंतर्मनाशी झालेला संवाद आहे. या सखीच्या रूपाने जे हितगुज लेखिका करते, त्यातून तिच्या समृद्ध व्यक्तिमत्त्वाचाही अनुभव आपण घेतो. हा सर्व प्रवास वाचनीयच आहे.

नर्मदा परिक्रमा : एक अंतर्यात्रा - भारती ठाकूर, गौतमी प्रकाशन, नाशिक, पृष्ठे २६१, मूल्य : २०० रुपये.

Thursday, November 19, 2009

Bharati’s book motivates us to undertake the parikrama

Z_©Xm n[aH«$_m-EH$ A§V`m©Ìm

nwñVH$ n[aM`, वनस्थली, दिवाली विशेषांक, २००९, पुणे  

d¥fmbr nQ>dY©Z

Ia§ Va ho "nwñVH$-narjU' Zmhr. ^maVr R>mHy$a `m§Zr {b{hbob§ "Z_©Xm n[aH«$_m-EH$ A§V`m©Ìm'ho nwñVH$ dmMë`mda _bm H$m` dmQ>b§-H$m` ^mdb§ ho eãXmV _m§S>Ê`mMm hm àm_m{UH$ à`ËZ Amho. Z_©Xm n[aH«$_o~Ôb AmUIr XmoZ nwñVH§$ `mAmYr dmMbr hmoVr. Ë`m_wio `mV ZdrZ H$m` AgUma? Aer e§H$m hmoVr. nU nwñVH$ nm{hë`mda Vo bJoM hmVmV KoD$Z MmiÊ`mMm Am{U Z§Va Vo PnmQ>çmZ§ dmMyZ nyU© H$aÊ`mMm _moh Q>miVmM Ambm Zmhr. AJXr erf©H$mnmgyZM gwé H$am`M§ Va-erf©H$ gwÕm Iyn H$mhr gm§JyZ OmUma§ Amho. Z_©Xm n[aH«$_m A{Ve` IS>Va Agbr Var ~aoMOU hr n[aH«$_m H$aÊ`mMm à`ËZ H$aVmZm

{XgVmV. Ë`m_mJo AÜ`mË_, lÕm, Am§V[aH$ AmoT>, gmhg, H$mhrVar doJi§-AdKS> Jmoï> Ho$ë`mM§ g_mYmZ {_idU§

Ago CÔoe Agy eH$VmV. nU ^maVrVmBªZr åhQ>ë`mà_mUo Ë`m§Mr Z_©Xm n[aH«$_m hr EH$ "A§V`m©Ìm' R>amdr. Ë`m§À`m `m A§V`m©ÌoV AmnUhr Ë`m§Mo ghO ghàdmgr hmoD$Z OmVmo. Ë`m§Mo gJio AZw^d Ë`m§À`m~amo~a KoV OmVmo. `mM§ H$maU Ë`m§Mr A{Ve` ghO-gw§Xa, AmoKdVr àm_m{UH$ ^mfm. Ë`mV eãXm§M§ Hw$R>ohr _wÔm_ AdS>§~a Zmhr. ~è`mM {R>H$mUr

doXCn{ZfXm§Mm MnIb g§X^© Ë`mÀ`m gmoß`m _amR>rVë`m AWm©_wio AmZ§X XoD$Z OmVmo. g§V VwH$mam_m§Mo A^§J,

H$~raXmgm§Mo Xmoho, ~{hUm~mBªÀ`m H${dVm, nmS>JmdH$am§À`m H${dVm, BVH§$M Zìho Va ^maVrVmBªÀ`m d{hZtÀ`m gmÜ`m g§gmar AmB©À`m CËñ\y$V© Amoì`m- `m gJù`m Jmoï>r ^maVrVmBªZm doimodoir AmR>dVmV. Ë`mVyZ Ë`m Amnë`mbm Oo gm§Jm`M§ Vo Amnë`mn`ªV WoQ> nmohmoMdVmV.

Ë`m§À`m `m n[aH«$_oV Ë`m§À`m XmoZ _¡{ÌUr. Á`oð> {J`m©amohH$ Cf…à^m nmJo Am{U nÌH$ma {Zdo{XVm Im§S>oH$a Ë`m§À`m~amo~a hmoË`m. nU _bm OmñV AmdS>br Ë`m§À`m "A§V`m©Ìo'V Ë`m§À`m~amo~a AgUmar-"gIr' OUy Ë`m§M§ A§V_©Z! hr "gIr' Ë`m§Zm doimodoir Q>moH$Vo-WmondVo-gmdY H$aVo. H$Yr H$Yr Iyn N>mZ VÎdkmZ ghO gm§JyZ OmVo. Z_©Xm n[aH«$_m H$aVmZm dmQ> MwH$m`bm bmJb§ Va H$moUr Zm H$moUr ^oQ>V§. _mJ©Xe©Z H$aV§ Ag§ åhUVmV. A§JmaoídamhÿZ AmoOH$S>o OmUmè`m dmQ>oda Ë`m§Zm hr AZw^d Ambm. nU lÜXm-A§YlÜXm `m dmXmV Z AS>H$Vm Ë`m§À`m "gIrZ§' `m _XVrÀ`m "M_ËH$ma' eãXmda Amjon KoV åhQ>b-"M_ËH$ma

eãXmEoOdr _mUwgH$sMm na_mZw^d åhU. hr ZdrZ dfm©Mr ^oQ> Zmhr, Zddfm©V Vy {eH$bobm hm n{hbm YS>m Amho.'

^maVrVmBªMr hr "gIr' dmMH$m§À`mhr "gIr'bm ZŠH$sM gmX KmbVo!

ñdm_r {dO`mZ§Xm§À`m Aml_mVë`m ^oQ>r g§X^m©V Ë`m§Zr F$½doXmVbm "hmVm§' ~m~VMm íbmoH$ gm§{JVbm`-Ë`mMm hr _amR>r AZwdmX Ho$di Aà{V_!(n¥.27).

Z_©Xm n[aH«$_o_mJMr ^maVrVmBªMr ^y{_H$m ñnï> hmoVr. Ë`mV AÜ`mpË_H$Vonojm Aä`mgmMr ^mdZm OmñV hmoVr Ag§ dmQ>V§. Ë`m_wioM Ë`m§À`m `m g§nyU© n[aH«$_m _mJm©V Ë`m§Zr {OWo {OWo _wŠH$m_ Ho$bm {VWë`m bmoH$OrdZmM§, Hw$Qw>§~m§M§, Hw$Qw>§~mVë`m bmoH$m§À`m nañna ZmVog§~§Ym§M§ Ë`m§Zr gwaoI {MÌU Ho$b§`. Vohr ghOnUo.

Ë`m n[agamVbm gm_mÝ` g_mO, Ë`m§Mr {dMmagaUr, lÕmñWmZ§, Hw$Qw>§~mVë`m _wbr Am{U pñÌ`m§M§ ñWmZpñWVr AZoH$ àg§Jm§_YyZ Ë`m ZoQ>Ho$nUmZ§ _m§S>VmV. n[aH«$_m H$aUmè`m§Zm "gXmd«V' H$éZ {^jm _mJyZ amhmd§ bmJV§. Amnbo gJio gm_m{OH$, Am{W©H$, e¡j{UH$ g§X^© _mJo gmoSy>Z [^jm _mJU§ `mV Ah§H$ma H$gm JiyZ nS>Vmo Vohr Ë`m gm§JVmV-"gIr'~amo~a

"eoAa' H$aVmV! AerM dmQ>oV ^oQ>bobr "eer' ZmdmMr A{e{jV ñÌr Ë`m§À`m {dMmam§Zm doJirM MmbZm XoVo. gwI Xþ…ImM§ _mn àË`oH$mÀ`m VamOyV doJdoJi§ H$m AgV§?-gIr _XVrbm YmdyZ `oVo-

Life is not a problem to be solved

A question to be answered,

It is a mystery to be comtemplated,

Wondered at and solved



Am`wî`mdaM§ ho CÎm_ ^mî` `m nwñVH$mMr C§Mr gm§JV§! AZoH$ àg§Jm§_YyZ, C"oIm§_YyZ Ë`m§M§ {ZgJ©ào_, n`m©daUdmXr Ñ{ï>H$moU {XgyZ `oVmo. {H$VrVar nú`m§Mr ZmdmgH$Q> ~maH$mB©Z§ Ho$bobr dU©Z§ Ë`mM§ àË`§Va XoVmV. Z_©Xm_mB© daÀ`m YaUm_wio {dñWm{nV

hmoUmè`m§Mm àíZ Ë`m§Zm AñdñW H$aVmo. n[aH«$_ogmR>r H$mhr _{hÝ`m§gmR>r Amnb§ Ka gmoSy>Z OmVmZm _ZmV H$mbdmH$mbd hmoVo, Va Ë`m YaUJ«ñVm§M§ H$m`? Agm ghO ^md Ë`m ì`ŠV H$aVmV.

nwñVH$mV eodQ>r "Z_©Xm CËnÎmr H$Wm' Amho. nwamUmMo XmIbo XoD$Z ^maVrVmBªZr hr H$Wmhr gw§Xa _m§S>br Amho. hm g§X^© `m nwñVH$mM§ d¡{eîQ>ç R>amd§. "Z_©Xm_mB©'bm An©U-n{ÌH$m gmXa H$aVmZmM ^maVrVmBªZr `m nwñVH$mM§ gma, CÔoe gm§{JVbm` Am{U eodQ>r hr "gIr'H$Sy>Z Amnë`mbm gm§{JVb§` H$s "hr n[aH«$_m Zìho, hr Va A§V`m©Ìm-H$_©`moJmÀ`m _mJm©da

gmYZoMr AI§S> Á`moV öX`mV VodV R>odUmar.. H$Yrhr Z g§nUmar.'

ho nwñVH$ dmMyZ _mÂ`mgma»`m gm_mÝ` J¥{hUrÀ`m _ZmV-"AmnUhr `m n[aH«$_m _mJm©da Amnë`mbm O_ob {VVH$m àdmg H$éZ AZoH${dY AZw^dm§Mr {eXmoar JmR>rer ~m§Ymdr' Agm {dMma Ambm-g_n©H$ _wIn¥ð>, CÎm_ N>nmB©, gw§Xa {MÌ, CËH¥$ï> Q>mB©n, nwñVH$ {dH$V KoD$Z dmMmd§ BVH$s _m\$H$ qH$_V, `m ì`mdhm[aH$ ~mOyhr O_oÀ`mM AmhoV. nU Ë`mV Ambobo {d{dY àg§J-Ë`mdaM§ bo{IHo$M§ ^mî` dmMH$mbm gwÕm ZH$iV {dMma H$am`bm bmdV§-

Vwåhr ho nwñVH$ dmMb§V Va ^maVr R>mHy$a `m§M§ ho n{hb§M nwñVH$ Amho, `mda Vw_Mmhr {dídmg ~gUma Zmhr. bo{IHo$Mr Z_©Xm n[aH«$_oÀ`m {Z{_ÎmmZ§ gwé Pmbobr "A§V`m©Ìm' Amnë`mhr "gIr'~amo~aÀ`m "A§V`m©Ìo'bm gwédmV H$éZ XoVo ho `m nwñVH$mM§ gdm©V _moR>§ `e!



Z_©Xm n[aH«$_m…EH$ A§V`m©Ìm

bo{IH$m - ^maVr R>mHy$a

àH$meH$ - Jm¡V_r àH$meZ

n¥ð>o - 261, _wë` - 200 é.

nwñVH$ n[aM`- d¥fmbr nQ>dY©Z

"ea`w', nÌH$ma ZJa, nwUo-16

Bhagyashree Kulkarni says the book is a must read

नर्मदा परिक्रमा- माणुसकीचं संचित

सौ. भाग्यश्री कुलकर्णी
http://marathi.webdunia.com/miscellaneous/literature/bookreview/0909/11/1090911045_1.htm

वास्तविक आतापर्यंत नर्मदा परिक्रमा या विषयावर बरेच काही लिहिले गेले आहे. मराठीत जगन्नाथ कुंटेंचे किंवा अमृतलाल बेगड यांचे अनुवादित पुस्तकही आले आहेत. तरीही प्रत्येकाला भावणारी नर्मदा वेगळी असते. नाशिकच्या भारती ठाकूर आणि त्यांच्या निवेदिता खांडेकर व उषःप्रभा पागे या दोन मैत्रिणींना दिसलेली आगळी नर्मदा 'नर्मदा परिक्रमा- एक अंतर्यात्रा' या पु्स्तकातून सामोरी येते. नर्मदेभोवती धार्मिक अवगुंठन असले तरीही तिला त्यात बंदिस्त न करता, तिच्याकाठी नांदणारी संस्कृती, समाजवास्तव आणि तिथला निसर्ग भारतीताईंनी टिपला आणि ते सारं या पुस्तकात मांडलं आहे. दैनंदिनीची छटा असलेलं हे लिखाण एका पुस्तकात बांधले आहे आणि नर्मदेच्या प्रवाहासारख्या लेखणीमुळेच ते वाचनीयही झाले आहे.
अमरकंटकपासून सुरू झालेली ही यात्रा म्हणजे दुर्दम्य माणुसकीच्या अनुभवांचे एक संचितही आहे. एरवी शहरी जीवनात हरवलेली किंवा सहसा न सापडणारी माणुसकी नर्मदेच्या काठावर मात्र लेखिकेला विपुल प्रमाणात सापडली. याचा अर्थ वाईट अनुभव आलेच नाहीत, असे नाही. पण एकुणात हे अनुभव म्हणजे नर्मदेच्या प्रवाहातले अपवादात्मक गढूळ पाणी. बाकी स्वच्छ, नितळ मनाची ही माणसं भारतीताईंची परिक्रमा सुसह्य करतात. पण त्यांच्या मदतीतून त्यांचा स्वतःचा जीवनपटही उलगडत जातो.
भारतीताईंना भेटलेली साधी, अत्यंत गरीब पण मनाने फार श्रीमंत असणारी माणसे आपल्याला आपली जागा दाखवून देतात. आपल्या दाराशी आलेला याचक बघताच त्याच्या हेतुविषयीच पहिल्यांदा आपण शंकीत होतो, पण नर्मदेच्या तीराभोवतीच्या काठावरची गोरगरीब मंडळी मात्र परिक्रमावासीयांना बघून, माताजी, माताराम म्हणत किती मदत करतात, याची ह्रद्य वर्णनं या पुस्तकात आहेत. स्वतःकडे अन्नाची कमतरता असतानाही केवळ परिक्रमावासीयांना मदत करून पुण्य कमावण्याच्या सात्विक आनंदापोटी ही मंडळी जे काही करतात, त्याने आपल्या खुजेपणाची जाणीव गडद होते.
परिक्रमेच्या मार्गावर पडणारी गावं अतिशय साधी आहेत. त्यांचे जीवनही कष्टाला बांधले गेलेले आहे. त्यांचे सामाजिक वास्तवही वेगळे नाही. पण त्यातही कुठेतरी नवीन विचारांचे बीज पडल्याचेही दिसून येते. गरीबीतही टुकीने संसार करून परिक्रमावासीयांना मदत करणारे अनुभव जसे ह्रद्य आहेत, तसेच नित्यकामात अडकलेल्या स्त्रियांची दुःखेही त्यांना दिसली. या तिघीही स्त्रियाच असल्याने अनेक जणी त्यांच्यापुढे मोकळ्याही झाल्या. आपले भोग सांगून हलक्या झाल्या. पण स्त्रियांचे केवळ हेच रूप या परिक्रमेत दिसले असे नाही. एका आदिवासी तरूणी या तिघींनी जेवायला बोलावले. त्यावेळी घरच्यांची परवानगी घेतली का का असा प्रश्न विचारल्यावर 'त्यांना काय विचारायचे?' असे सांगून, निर्णयाची 'दोरी' आता ग्रामीण स्त्रियांच्या हातातही यायला लागली आहे हे वास्तवही त्यातून दिसून येते. अनेक साधू-साध्वीही या काळात त्यांना भेटले. त्यांची जीवनपद्धतीही जवळून पहायला मिळाली. परिस्थितीतून आलेल्या साध्वीपणातूनही उचंबळणारी माया आणि हेच भगवे कपडे नेसून आलेले तुटक कोरडेपणही त्यांना अनुभवायला मिळाले.
भारतीताईंची भाषाही फार सोपी आणि प्रवाही आहे. वाचताना जणू चित्रफितच डोळ्यांसमोर फिरतेय, असा भास होतो. म्हणूनच निसर्गाचे वर्णनही कधी नीरस होत नाही. आजूबाजूचा निसर्ग, तिथले प्राणी-पक्षी त्यांची नावे आणि इंग्रजी नावेही त्या देतात. या सगळ्या पसार्यात बाजूला असलेल्या नर्मदेचा हातही कधी सुटत नाही. म्हणूनच निसर्गाबरोबरच नर्मदामय्याची बदलती रूपही त्या टिपत जातात.
नर्मदेवर बांधण्यात येणार्या धरणामुळे विस्थापित होणार्यांचे वास्तव, त्याचे त्यांच्या जीवनावर होणारे परिणाम लेखिका अगदी परीणामकारकरित्या आपल्यापर्यंत पोहोचवते. त्यातला ज्येष्ठ वृद्धांचा प्रश्न तर डोळ्यातुन पाणीच काढायला लावतो. शहरी जीवनातील संकल्पना, जगण्यातले टोकाचे आग्रह, खाण्याच्या सवयी, स्वामित्वाची भावना, आपणच वाढवलेल्या आपल्या गरजा ह्या सगळ्यांची जाणीव पुस्तक वाचताना जागोजागी होत रहाते. हे असतानाही परिक्रमेत शारीर तसेच मानसिक दृढतेच्या कमाल पातळ्यांचा कस लागणार्या घटनाही शहारे आणतात.
एरवी आपल्या सुरक्षित जगात वावरताना किती अकारण आणि अवाजवी गोष्टींचा संग्रह करत असतो हे ते वाचताना वारंवार जाणवते. सुरक्षित जगात वावरतानाही आपण जेवढे निवांत नसतो, त्याहूनही अधिक निवांत आपण त्या परिक्रमेत असतो, हे भारतीताई दाखवून देतात. स्वत:कडे कोणताही संग्रह नाही. उद्या काय घडणार आहे त्याची शाश्वती नाही. एवढेच काय पण जेवणासाठीचीही तरतुद नाही, असे असतानाही कोणत्यातरी अज्ञात शक्तीच्या भरवशावर आपण पुढे जात असतो. वाटेतल्या सगळ्या संकटाची काळजी घेणारा 'तो' कोणत्या ना कोणत्यातरी रुपात आपली काळजी घेतो. मनातल्या 'बाळबोध' वाटणार्या इच्छाही तो पूर्ण करतो, याचा प्रत्ययही पदोपदी भारतीताईंना आला.
यात्रा सुफळ संपल्यानंतर एका स्वामिजींशी झालेल्या बोलण्यात परिक्रमेने काय मिळवलं, यावर ते स्वामीजी जे सांगतात, ते फार चिरंतन आहे. ' एरवी आपण आपल्या आयुष्यात एक निश्चित, आखीव रेखीव जगत असतो. पण तरीही निश्चिंत नसतो. इथे परिक्रमेत तर उद्या काय होईल, खायला मिळेल की नाही याचीही शाश्वती नसते. तरीही काही सुखरूप पार पडतं. किंबहूना तो प्रश्नही मनात उभा रहात नाही. ही निश्चिंतता हेच प्रारब्ध असतं.'
आणि हो, या सगळ्या परिक्रमेत, भारतीताईंच्या मनातली सखीही त्यांची साथसोबत करत होती. वेळोवेळी आपली मते, विचार मांडत होती. गुजगोष्टी करत होती. भारतीताईंना या यात्रेतून कशाचा शोध घ्यायचा नव्हता. आजूबाजूला भेटणार्या माणसातून, निसर्गातून आणि विविध गोष्टीतून परमेश्वर त्यांना 'दर्शन' देतच होता. या सगळ्या बाह्यजगतातल्या घडामोडींचा प्रवास भारतीताईंच्या मनातही सुरूच होता. म्हणूनच या पुस्तकाला दिलेले अंतर्यात्रा हे उपशीर्षक अगदी समर्पक आहे. पुस्तकातली धनंजय गोवर्धनेंची रेखाटनेही छान आहेत. आणि चंद्रमोहन कुलकर्णींचे मुखपृष्ठही समर्पक.

नर्मदा परिक्रमेवरचं हे पु्स्तक नक्कीच वाचायला हवे.
---
नर्मदा परिक्रमा- एक अंतर्यात्रा
लेखिका- भारती ठाकूर
गौतमी प्रकाशन, नाशिक
किंमत- २०० रूपये